25 Jun 2021 5:50 am
अब्दुल | रघुभैया |
अब्दुल | रघुभैया |
इतरांच्या आनंदात आनंद मानणारा | स्वत:च्या कुटुंबाला महत्त्व देणारा |
व्यवसायातील फायद्याचा विचार न करता समाजसेवा करणारा | स्वत:च्या धंद्यात फायदा कमवणारा |
मानवसेवा करणारा असामान्य माणूस | चारचौघांसारखा सामान्य माणूस |
खालील विधानांमागील कारणे लिहा.
अब्दुल तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असल्याचे लोकांना समजले, तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्या धंद्यावर होईल, असे शन्नूला वाटले.
(B)आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.
संक्रांतीच्या दिवशी तपोवनातील मुली व स्त्रियांच्या हातात बांगड्या भरल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अब्दुलला अनमोल आनंद मिळत असे. अब्दुलला ही दुर्मीळ संधी वाटत असे.
दाजीसाहेब-
(B)गुणविशेष लिहा.
शन्नोची स्वभाववैशिष्ट्ये-
Q4.खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.
वाक्ये | अव्यये | प्रकार |
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. | ||
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. | ||
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. | ||
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. |
वाक्ये | अव्यये | प्रकार |
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. | जवळ | शब्दयोगी |
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. | आणि | उभयान्वयी |
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. | बाप रे! | केवलप्रयोगी |
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. | भरभर | क्रियाविशेषण |
Q5.विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
(A)‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’
(B)’अन्वर जेवला?“
Q6.खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा.
Do it yourself.
Q7.(A)सत्यता पटवून द्या- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’
अब्दुल हा बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणारा एक सर्वसामान्य माणूस; पण दाजीसाहेबांच्या तपोवनातील कुष्ठरोगी स्त्रियांना वर्षातून दोनदा बांगड्या भरण्यासाठी तो स्वत:हून तयार झाला. दरवर्षी न चुकता, न बोलावता, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो त्या स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. कुष्ठरोगी भगिनींच्या जीवनात आनंद, उत्साह निर्माण करत असे. ‘कुष्ठरोग’ हा तसा सर्वसामान्यांच्या दृष्टीने नावडता विषय. त्यातही अशा स्त्रियांच्या हातात बांगड्या भरणे हे अवघड कार्य; पण अब्दुलने हेही सहज केले. पत्नीची बोलणी सहन करत, ऐन सणांदिवशी आपले चुडीचे दुकान बंद ठेवून, स्वत:च्या फायद्याचा जराही विचार न करता तो तपोवनात जात असे व मनापासून आपले काम करत असे. मनपसंत बांगड्या भरल्यानंतर या लेकीबाळींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहण्यात त्याला खूप समाधान मिळत असे. सत्कार समारंभाचे निमंत्रण ऐकून त्याला आनंद झाला; पण तपोवनासाठी मी काही सत्कार करण्याएवढे कार्य केले नाही असे वाटण्याइतकी साधी, नम्र वृत्ती त्याच्याजवळ होती, म्हणून अब्दुल एक थोर समाजसेवक आहे, असे मला वाटते.
(B)शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य गृहिणी आहे. इतरांप्रमाणेच आपल्या पतीनेही चांगला धंदा करावा, खूप पैसे कमवावेत, म्हणजे घर व्यवस्थित चालेल असा तिचा विचार आहे. शिवाय, ऐन सणांदिवशी, ज्यावेळी कितीतरी बायका दुकानात बांगड्या भरायला येतात त्यावेळी अब्दुल आपले दुकान बंद ठेवून तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जातो, हे तिला पटत नाही कारण, त्यामुळे चांगले पैसे कमावण्याची संधी अब्दुल गमावून बसतो. परिणामी, पुरेसे पैसे मिळत नाहीत आणि आपल्या मुलाचा साधा हट्टही पुरवता येत नाही, जमा-खर्च बसवताना ओढाताण होते, असे तिला वाटत असावे. या सर्वांचा परिणाम म्हणून अब्दुलला शन्नूची बोलणी ऐकावी लागतात; पण तिच्या अशा वागण्यामागे कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून ‘आपल्या कुटुंबाचा विचार’ महत्त्वाचा आहे, असे दिसते.
(C)तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय नक्कीच वाढवू शकेल. त्यासाठी त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विविध समाजमाध्यमांवर बांगड्यांच्या जाहिराती टाकून तो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. त्या जाहिरातींसोबतच आपला व्यवसाय ‘डिजिटल’ पद्धतीने सर्वत्र पोहोचवण्यासाठी तो स्वत:चे ‘ॲप’ विकसित करू शकतो. त्या ॲपवर तऱ्हेतऱ्हेच्या बांगड्यांचे नमुने पेश करून, आकर्षक सवलती (ऑफर्स) देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. शिवाय, ऑनलाइन मार्केटिंग सुरू करून तो देशातच नाही, तर परदेशातूनही मागणी मिळवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.
शिवाय, बांगड्या बनवण्यासाठीची नवीन यंत्रसामग्री विकत घेऊन तो विविध प्रकारच्या (लाखेच्या, काचेच्या, प्लास्स्टिकच्या), विविध रंगांच्या, आकाराच्या बांगड्या बनवू शकतो व आपला व्यवसाय वाढवू शकतो.
(D)दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.
सहावीत असतानाची गोष्ट. परीक्षा जवळ आलेली असताना माझा मित्र अचानकच आजारी पडला. परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसा वेळ नव्हता. त्याची अडचण लक्षात येताच मी माझ्यापरीने त्याला जमेल ती मदत करू लागलो.
अवघड गणिते, इतर विषयांचे परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न मी त्याला समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्याची उजळणी करून घेतली. परीक्षेच्या काळात आम्ही एकत्र अभ्यास करायचो. परीक्षा संपल्यावर त्याने माझा हात हातात घेतला व आभार मानले. ओलावलेल्या नेत्रांनी त्याने मला प्रेमभराने मिठी मारली. हा आनंदाचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.
COMPLETED